मुंबई : बॉलिवूडचा 'बादशाहा' म्हणून ओळख असणाऱ्य़ा अभिनेता शाहरुख खान याच्यापाठी सध्या वाईट काळ लागला आहे. एकही गोष्ट त्याच्या कलानं घडताना दिसत नाही आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी सध्या कारागृहात आहे. त्याता जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे आर्यनची सुटका नेमकी करावी तरी कशी यासाठीच शाहरुख आणि त्याची संपूर्ण टीम प्रयत्नांत दिसत आहे. (Shah rukh khan, Aryan Khan, Gauri khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिस्थितीनं आपल्याकडे पाठ फिरवलेली असतानाच शाहरुख आणि गौरीवरही या साऱ्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 


सणवाराच्या दिवसांमध्येच 'मन्नत'वर मात्र एकच शांतता दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


इतकंच नव्हे, तर शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली, पण तरीही हा दिवसही इथं तसूभरही साजरा केला गेला नाही. 


दरवर्षी शाहरुख आणि गौरी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी काही धार्मिक विधी पार पाडतात. पण, आर्यन संकटात असताना या दोघांनीही ही 30 वर्षांची परंपरा मोडली आहे. 


शिवाय शाहरुख या दिवशी गौरीला खास भेटही देतो. पण, यंदा मात्र त्यानं असं काही केलं नाही. तर, गौरी या दिवशी आर्यनची भेट घेण्यासाठी कारागृहात आली होती. 


मुलगा अडचणींच्या गर्द छाय़ेत असतानाच शाहरुख आणि गौरी ही सेलिब्रिटी जोडीही बेचैन दिसत आहे.