पुणे : सध्या देशात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसाचा वाद रंगला आहे. राजकीय वर्तुळात हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकरवरून उग्र राजकारण होत आहे. या वादावर प्रत्येकजण आपली बाजू मांडत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाला सोनू सूद?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आहे. आपले म्हणणे मांडत त्यांनी कोरोनाचा काळ नमूद केला आहे. तो म्हणतो – लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर वाईट वाटतं. लोक आता ज्या प्रकारे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि विष पसरवत आहेत ते पाहून दु:ख होते. गेल्या अडीच वर्षांत आपण सर्वांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढा दिला.


“राजकीय पक्षांनीही या साथीच्या विरोधात खांद्याला खांदा लावून तोंड दिले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्व कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज असताना धर्माची पर्वा कोणी केली नाही. कोरोनाच्या धोक्याने आपला देश एकत्र आणला होता. आमची नाती धर्माच्या पलीकडे एका अतूट बंधनात बांधली गेली होती.


सोनू सूद यांचे नेत्यांना आवाहन


सर्व राजकीय पक्षांना आवाहन करत सोनू सूद म्हणाला की, हीच वेळ आहे जेव्हा आपल्याला एका चांगल्या भारतासाठी एकत्र यायचे आहे. धर्म आणि जातीच्या सीमा तोडल्या पाहिजेत. जेणेकरून आपण मानवतावादी आधारावर योगदान देऊ शकू. धर्माच्या पलीकडे एकत्र उभे राहिलो तर लाऊडस्पीकरचा वाद आपोआप संपेल. माणुसकी, बंधुता समाजात नांदेल. सोनू सूद याने पुण्यात झालेल्या JITO Connect 2022 समिटमध्ये हे वक्तव्य केलं आहे.


देशात सुरू असलेल्या लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादावर सोनू सूदने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही सामाजिक, राजकीय विषयावर तो मत मांडायला मागेपुढे पाहत नाही. सोनू सूदने कोरोनाच्या काळात गरिबांना खूप मदत केली. त्यामुळे सोनू सूदला मसिहाचा ​​टॅग मिळाला. सोनू सूद अजूनही लोकांना मदत करत आहे. लोक त्याला ट्वीट किंवा वैयक्तिक संदेशाद्वारे मदतीची विनंती करतात.