मुंबई : लेखिका, निर्माता आणि कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) ही अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmaan Khurrana)ची पत्नी. सध्या आयुष्मान खुराना 'बाला' (Bala)सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. 'बधाई हो' (Badhai Ho) ते अगदी आतापर्यंत आयुष्मान खुरानाच्या सगळ्या सिनेमांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. असं असतानाही ताहिरा कश्यपला आयुष्मानच्या या गोष्टीची भीती वाटत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताहिरा कश्यप म्हणते,'आयुष्मान खुरानाच्या 'त्या' दृश्यां (Make-Out Scenes)मुळे असुरक्षित वाटत आहे.' पण ती या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ताहिराला आयुष्मान खुरानाच्या विक्की डोनर(Vicky Donor) सिनेमातील यामी गौतम (Yami Gaitam)सोबतच्या  इंटिमेट सीनने खूप असुरक्षित (Insecure)वाटत असल्याचं तिने कबुल केलं आहे. 



एवढंच नाही, तर पुढे ताहिरा म्हणाली की,'जेव्हा मी 'अंधाधुन' (Andhadhun)सिनेमा पाहिला तेव्हा मला आयुष्मान आणि राधिका आपटे (Radhika Apte) च्या सीनमध्ये काही तरी हरवल्यासारखं वाटतं होतं. आणि तसं मी सिनेमाच्या टीमला सांगितलं देखील. तेव्हा माझ्या स्वतःमधला बदल मी अनुभवला. इंटिमेट सीनमुळे असुरक्षित वाटणारी मी आणि आताची मी यामध्ये खूप बदल होता.'



ताहिरा आयुष्मान खुरानाला गेली 18 वर्षे ओळखत आहे. 'आयुष्मानची पत्नी' म्हणून ओळख करून घेण्यात तिला अभिमान वाटत असल्याचं देखील ती म्हणते. आणि ताहिराच्या ओळख ही सर्व जगाला ही आहेच. मी जशी आहे, माझे विचार आणि माझी उपस्थिती लोकांनी स्विकारली आहे, असं ताहिरा म्हणते. आयुष्मानबद्दल ताहिरा सांगते की, 'तो अंतर्मुख (introvert)आहे. 10 लोकांसोबत असला तरीही त्याला शांत बसायला आवडतं. आयुष्मानला जास्त बोलायला नाही आवडत पण तो चांगलं ऐकतो. (He is good listener)'.



'बाला' सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर आयुष्मानने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आयुष्मान खुरानाच्या 'बाला' सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडून आतापर्यंत 138 करोडहून अधिक कमाई केली आहे.