मुंबई : गेल्या महिन्यात लोकप्रिय टीव्ही कपल जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा घटस्फोट झाला. यानंतर टीव्ही अभिनेत्री तोरल रसपुत्रचा घटस्फोट झाल्याची खबर आली होती. त्यानंतर आता टेलिव्हीजनवरील अजून एक लोकप्रिय अभिनेता अविनाश सचदेव विवाहबंधनातून मुक्त होत आहे. पत्नी शाल्मली देसाईपासून त्याने घटस्फोट घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


म्हणून झाला घटस्फोट


एका मुलाखतीत अभिनेता अविनाश सचदेव याने घटस्फोटचा खुलासा केला. १२ जून २०१५ मध्ये अविनाश-शाल्मली यांनी प्रेमविवाह केला. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. अविनाशचे दुसऱ्या एका महिलेशी अफेअर असल्याचे शाल्मलीला वाटत होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात सतत भांडणे होत असून नात्यात काहीही ठीक नव्हते. तरीही देखील दोघांच्याही परिवाराने नाते टिकवण्यचा सल्ला त्यांना दिला. पण गोष्टी अधिक बिघडत गेल्या आणि दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 


तेव्हा सुरु झाले अफेअर


'इस प्यार को क्या नाम दूं' च्या दुसऱ्या सीजनच्या शूटिंगपासून यांचे अफेअर सुरु झाले. दीर्घ काळ डेट केल्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला पण तो यशस्वी ठरला नाही.