मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ डिसेंबरला हा विवाह इटलीच्या बोर्गो फिनोकच्योतोमध्ये झाला. या विवाहाची जोरदार चर्चा झाली. तसेच या सोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले. आता २६ डिसेंबर रोजी या दोघांचे रिसेप्शन दिल्लीत होणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांना बोलवण्यात आले आहे. याची यादी देखली ठरली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील दोन खान समाविष्ट आहेत, मात्र एका खानला वगळण्यात आल्याची चर्चा आहे. 


काय आहे खरं कारण? 


सुल्तान स्टार सलमान खान या गेस्ट लिस्टमधून गायब आहे. याचं कारण असं सांगितलं जातं की, सलमान खान आणि अनुष्काची बॉंडिंग काही फार खास नाही. जूमच्या एका रिपोर्टनुसार, सुल्तानच्या रिलिज अगोदर अनुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान खानचं वागणं हे भरपूर घाबरवणार आहे. त्यामुळे ती सलमानसोबत जास्त मिक्स झालेली नाही. अनुष्का असं म्हणाली की, याच कारणामुळे आमचं बॉंडिंग झालं नाही. मी साध सरळ सलमानसोबत वागू शकले नाही. तो शुटिंग दरम्यान आपल्या गोष्टींमध्येच असतो. तसेच मला ते सहज शक्य झालं नाही. त्यामुळे मी आमच्यातील अंतर कमी करू शकले नाही.