मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघंही सध्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. रणबीर आणि आलिया यांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट. या दोघांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर आणि आलियाच्या नात्याविषयी चर्चा होण्याचं कारण म्हणजे या दोघांमध्ये बहरणारं प्रेम. विविध कार्यक्रमांपासून थेट आफ्रिकेमध्ये जंगल सफारीसाठी जाणाऱ्या रणबीर आणि आलियावर आता रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या य़ा रेल्वे प्रवासाचा एक व्हि़डिओही पोस्ट करण्यात आला आहे. 


जंगल सफारीहून परतलेल्या या सेलिब्रिटी जोडीला थेट रेल्वेने प्रवास करण्याची वेळ का बरं यावी? पडला ना तुम्हालाही हा प्रश्न? आता हे दोघं कोणत्या नव्या प्रवासाला वगैरे तर निघाले नाहीत ना.... हे असे तर्क लावूच नका. कारण, बी- टाऊनची ही जोडी रेल्वे प्रवास करत आहे ते म्हणजे एका जाहिरातीच्या निमित्ताने. 



सूत्रांकडून मिळालेल्या जाहिरातीनुसार एका जाहिरातीतून ते दोघंही एकत्र झळकणार आहे. त्यासाठीच हा रेल्वे प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता त्यांचा हा रेल्वे प्रवास सुखावह ठरतो का हे जाहिरात प्रदर्शित केल्यावरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास, या व्हायरल व्हि़डिओवरच चाहत्यांना समाधान मानावं लागणार आहे.