मुंबई : आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा 'गली बॉय' बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. रणवीर आणि आलियाची जोडी प्रेक्षकांनी भरपूर पसंत केली. सिनेमातच नव्हे तर अनेक जाहिरांमध्ये देखील हे दोघं एकत्र दिसले. पडद्यावर दोघांची केमिस्ट्री अधिक पसंत केली जाते. ऑनस्क्रीनसोबतच ऑफस्क्रीन देखील या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. मात्र अशी माहिती मिळतेय की, या दोघांच्या मैत्रीत कटूता आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंशाअल्लाह' या सिनेमाचं पुढे काही न झाल्यामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अभिनेत्री आलिया भट्टला घेऊन 'गंगूबाई' सिनेमा तयार करत आहे. या सिनेमात प्रमुख हिरोकरता अनेकांच्या नावाची चर्चा आहे. अखेर या नावाकरता भन्साळी यांनी अभिनेता रणवीर सिंहच्या नावाचा विचार केला. 


मात्र एका रिपोर्टनुसार, 'गंगूबाई' करता भन्साळीने आलियाच्या अपोझिट रणवीरचा विचार केला. सिनेमात कॅमिओबाबत त्याच्याशी विचारणा केली असता रणवीरने या रोलकरता नकार दिला. रणवीर सिंहने सिनेमा न करण्याचं कारण देण्यास नकार दिला. याचा खुलासा देखील अद्याप झालेला नाही. पण रणवीरने सिनेमा नाकारल्यामुळे आलिया नाराज झाली आहे. 


संजय लीला भन्साळी सलमान आणि आलियाला घेऊन 'इंशाअल्लाह' हा सिनेमा करणार होते. पण अचानक हा सिनेमा होणार नसल्याचं समोर आलं. आलियाने आयफा अवॉर्ड पुरस्कारात याबाबत माहिती दिली. त्यानंतर सलमानला विचारणा केली असता सलमानने नावाप्रमाणे 'इंशाअल्लाह' म्हणजे देवाला माहित असं उत्तर दिलं.