मुंबई : आपण हे पाहिलं असेल की, बऱ्याचदा काकाडी ही चवीला कडू लागते. त्यामुळे काही लोक तिचा एक तुकडा खाऊन बघतात आणि नंतर त्याच्या समावेश जेवणात करतात. परंतु काही असे देखील लोक आहेत. जे काकडीच्या शेवटचं टोक कापून त्यावर मीठ लावून चोळतात. ज्यामुळे यामधील कडवटपणा निघून जातात असं देखील सांगितलं जातं. परंतु खरंच असं केल्याने फरक पडतो का? असा अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, काकडीचा कडूपणा दूर करण्यासाठी नेहमी वापरल्या जाणार्‍या या ट्रिकचा खरोखर फायदा होतो की नाही आणि त्यामागील विज्ञान काय आहे आणि ते खरोखर किती फायदेशीर आहे?


काकडी कडू का आहे?


काकडी चोळल्याने कडवटपणा येतो का याविषयी बोलण्यापूर्वी, काकडी कडू का असते हे जाणून घेऊ या. सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की, सर्वच काकड्या कडू नसतात, परंतु त्यांच्या पिकण्यावर त्यांची चव अवलंबून असते.


काकडी हे एक फळ आहे, ज्यामध्ये CUCURBITACINS नावाचा पदार्थ आढळतो आणि तो कडू असतो. तसे, हे पदार्थ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भाजीपालाद्वारे उत्पादित केले जातात आणि हे फक्त कटुता ठेवते.


काकडी धुतल्याने कडूपणा दूर होतो का?


जर आपण काकडीचा कडूपणा दूर करण्याबद्दल बोललो तर असे म्हटले जाते की, काकडी चोळल्याने तिचा कडूपणा दूर होतो. ते चोळल्यावर त्यातून काही फेसही बाहेर पडतो, त्यामुळे कडूपणा येतो. या वस्तुस्थितीबाबत अनेक प्रकारचे संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये वेगवेगळे तर्क देण्यात आले आहेत.


लाइफ हॅकर, डेलीमेल, टुडे डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, असे केल्याने खरोखर परिणाम होतो आणि काकडीचा कडूपणा निघून जातो. रिपोर्ट्सनुसार, काकडीत असलेले Cucurbitactins नावाचे घटक काकडीच्या टोकावर असतात.


अशा परिस्थितीत जर आपण त्याचं टोक कापून आणि या टोकांना घासून फेस काढल्याने त्याचा कडूवटपणा दूर होतो. याशिवाय, असे केल्याने काकडीत क्युकर्बिटॅसिन पसरत नाही आणि काकडीचा कडूपणा बाहेर येतो.


तथापि, अनेक परदेशी वेबसाइट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जसजसे फळ पिकते तस-तसे क्युकरबिटासिनचे प्रमाण कमी होते. या कारणास्तव, पिकलेल्या फळांना कडू चव असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे, काकडीचे कापलेले टोक एकमेकांवर घासली की, ती कडू चव काढून टाकली तरी काही फरक पडत नाही.