मुंबई : उन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते. पण याचे फायदे आपल्याला नीटसे माहित नाहीत. पण फक्त लिंबूपाण्याने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकता. पण त्यासाठी लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला ठाऊक असायला हवी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. लिंबूपाण्यात सॅट्रीक अॅसिड असते. त्यामुळे किडनीस्टोनला आळा बसतो. नियमित लिंबूपाण्याचे सेवन केल्यास किडनीस्टोनची समस्या उद्भवणार नाही.


२. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेतल्यास पचनतंत्र मजबूत होते. अन्न लवकर पचते आणि फिट राहण्यास मदत होते.


३. लिंबात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नियमित लिंबूपाणी प्यायल्याने सर्दी-खोकलाची समस्या खूप कमी होते.


४. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास एक ग्लास लिंबूपाणी प्या. तोंडाची दुर्गंधीची समस्या दूर होईल. त्याचबरोबर तोंडही कोरडे पडणार नाही.


५. लिंबूपाण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते. याशिवाय वजन कमी करण्यास मदत होते.


टिप्स


लिंबूपाणी बनवताना नेहमी ताज्या लिंबाचा वापर करा. कोमट आणि थंड पाण्यात बनवलेले लिंबूपाणी तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर लिंबूपाण्याबरोबच जर तुम्ही संत्र, काकडी या फळांचे सेवन केल्यास अधिक फायदा होईल.