मुंबई : पावसाळ्यात तापाच्या समस्येने बहुतांश लोक हैराण झाले आहेत. या मोसमात लोकांना सर्दी, खोकल्यासोबतच तापाचा सामना देखील करावा लागतो. सकस आहार आणि काही काळजी घेतल्याने या समस्या दूर होतात, परंतु काही वेळा ताप बराच काळ टिकतो. अशा वेळी जर तुम्हालाही पावसाळ्यात बराच वेळ ताप येत असेल, तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका. शिवाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्या करुन घ्या. ज्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला जाणून घेऊया पावसाळ्यात ताप आल्यावर कोणती चाचणी करावी.


मलेरिया


मलेरिया हा पावसाळ्यात आढळणारा आजार आहे. हा रोग मादी डासांच्या चावल्याने पसरतो. हा डास साचलेल्या पाण्यात आढळतो. तापासोबत थंडी वाजून येणे, थरथर कापणे, घाम येणे आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसली तर नक्कीच मलेरियाची चाचणी करून घ्या.


टायफॉइड 


टायफॉइड हा पावसाळ्यात होणारा आजार आहे. हा आजार दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. टायफॉइडमध्ये दिवसा ताप जास्त राहतो, तर रात्रीपर्यंत शरीराचे तापमान कमी होते.


डेंग्यू


डेंग्यू हा एक विषाणू संसर्ग आहे, जो मादी एडिस इजिप्ती डासाच्या चावल्याने होतो. डेंग्यू ताप हा पावसाळ्यात बहुतेक लोकांना भेडसावणारी सर्वात सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला खूप ताप येत असेल तसेच डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, डोळ्यांच्या मागे दुखणे आणि अंगदुखीचा त्रास होत असेल तर या काळात डेंग्यूची चाचणी नक्कीच करून घ्या.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)