मुंबई : तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल. परंतु अशावेळी जोडीदारासोबत लहानमोठी भांडणं तर होतातच. परंतु या सगळ्यात नातं टिकवूटन ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमचं नातं टिकवून ठेवायचं असेल, तर काही चुका करणे टाळले पाहिजे. परंतु जर तुम्ही तुमच्या चुका वेळीच सुधारल्या तर नातं तुटण्यापासून तुम्ही वाचू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातं तुटण्यापासून वाचवण्यासाठी या चुका टाळा


जोडीदाराची फसवणूक


तुम्ही तुमच्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ राहा. फसवणूक ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे नाते तुटतं किंवा दुरावा निर्माण होतो. बहुतेक लोक जेव्हा नातेसंबंधात एकत्र येतात तेव्हा त्यांच्या जोडीदाराकडून अपेक्षा असतात. त्यांपैकी एक म्हणजे त्यांची नात्यात फसवणूक होऊ नये.


अशा वेळी जर अशी एखादी गोष्ट जोडीदारासमोर आली त्याला तुम्ही फसवणूक करत असल्याची जाणीव झाली, तर त्याच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आनंदी नाते हवे असेल, तर तुमच्या जोडीदाराची फसवणूक करू नका.


वेळ न देणे


चांगल्या नात्यासाठी आपापसात संवाद आणि प्रेम टिकवणे आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी रोज थोडा वेळ काढू शकत नसाल, तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो आणि तुमचे नातेही बिघडू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल, तर तुम्ही एकमेकांना वेळ द्या.


खोटं बोलणे


खोटे बोलणे किंवा काहीतरी लपविल्याने हळूहळू संशय निर्माण होतो आणि शंका कोणतंही नातं बिघडू शकते. बरेच लोक आपलं नातं खराब होईल म्हणून आपल्या जोडीदाराशी लहान-मोठं खोटं बोलतात. परंतु हे लक्षात ठेवा की, कारण काहीही असो, नात्यात खोटं बोलूच नका, उलट आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगा. यामुळे तुमचं नातं आणखी घट्टं होईल.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)