मुंबई : पपई हे असेच एक फळ आहे जे भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते आणि सर्वांना ते खायला आवडते देखील. या गोड आणि रसाळ फळाला खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देखील नियमित देतात, परंतु तुम्हाला माहित आहे का? की त्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने, त्याच्या फायद्याऐवजे, त्याचे नुकसानच शरीराला भोगावे लागू शकते. तसेच विशिष्ट प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी देखील या फळापासून अंतर ठेवावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरी पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे, चला याबद्दल माहिती जाणून घेऊया.


या लोकांनी पपई खाऊ नये


1. किडनी स्टोनचे रुग्ण


पपई हा व्हिटॅमिन 'सी'चा समृद्ध स्रोत आहे. परंतु हे पोषक घटक कॅल्शियममध्ये मिसळल्यास त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी हे फळ खाऊ नये.


2. औषधं घेणारे लोक


जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल, तर आंबलेली पपई तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अनेकदा हृदयविकाराशी संबंधित लोक हे औषध घेतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणतीही अडचण येत नाही. अशा रुग्णांनी पपई खाल्ल्यास दुखापतीतून रक्त सहज वाहू लागतं.


3. दम्याचे रुग्ण


जर तुम्हाला श्वासोच्छवासाची तक्रार असेल, तर पपईपासून लांब राहा. या फळामध्ये असलेले एन्झाईम्स दमा रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात.


4. गर्भवती महिला


अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, गर्भवती महिलांनी पपई अजिबात खाऊ नये, कारण ती त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.


5. ऍलर्जी असलेले लोक


जर तुम्हाला ऍलर्जी सारखी समस्या भेडसावत असेल, तर पपई अजिबात खाऊ नका, कारण त्यात असलेले तत्व समस्या वाढवू शकतात आणि तुम्हाला त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)