मुंबई : Rice benefits of health :जेव्हा कोणी वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम तो भात न खाण्याचा विचार करतो किंवा कमी करतो. अशा परिस्थितीत, प्रश्न पडतो की तांदळाचा वापर कमी केल्यास तुमच्या शरीरातील वजन खरोखर कमी होईल का? तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी खरोखर वाईट आहे का? तर उत्तर नाही असे आहे. अनेक पोषण तज्ज्ञ सांगतात की भात खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. भात खाण्याच्या 10 फायद्यांबद्दल जाणून घेऊया.


तांदूळ प्रीबायोटिक आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोषण तज्ज्ञ सांगतात की तांदूळ प्रीबायोटिक (Prebiotic) आहे. तांदळाचा भात खाल्ल्यानंतर पोट खूप लवकर भरते जेणेकरून पचन प्रणाली देखील मजबूत होते.


भात शिजवणे सोपे


पॉलिश केलेले तांदूळ अनेक प्रकारे शिजवले जाऊ शकते. भात शिजवणे सर्वात सोपा आहे. असे म्हणतात की ज्याला काहीही कसे बनवायचे हे माहित नसते, त्याला किमान भात कसा बनवायचा हे माहित असते.


रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते


जर भात दही, भात आमटी, शेंगा, तूप आणि मांसासह भात खाल्ला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो.


सहज पचण्याजोगे


भात सहज पचतो आणि पोटासाठी तो हलका असतो. भात खाल्ल्यानंतर आपल्याला चांगली झोप यायला मदत होते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन चांगले होते. जे वृद्ध आणि तरुण दोघांनाही आवश्यक असते.


त्वचेसाठी चांगले


भात खाणे त्वचेसाठी उत्तम आहे. जर तुमच्या शरीरावर वाढलेली छिद्र दिसली तर भात त्यांच्यापासून सुटका करण्यास मदत करु शकतो जे उच्च प्रोलॅक्टिन(High Prolactin Levels)  पातळीसह येतात.


केसांच्या वाढीसाठी उपयुक्त


केसांच्या वाढीमध्ये भात खाणे खूप मदत करतो. जर कुणाला केस गळण्याची तक्रार असेल तर त्याने नक्कीच भाताचे सेवन केले पाहिजे. कारण हे केस राखण्यास आणि सुधारण्यास मदत करू शकते.


प्रत्येक भाग वापरण्यायोग्य आहे


तांदळाचा प्रत्येक भाग वापरण्यायोग्य वास्तविक, शेतातून बाहेर येणाऱ्या तांदळाचा कोणताही भाग वाया  (Waste) जात नाही. तांदूळ मनुष्य खातात, तर कोंडाचा दुसरा भाग जनावरांना खायला दिला जातो.


मातीसाठी चांगला


कडधान्ये पिकवण्यासाठी तांदूळ जमिनीत पुरेसा ओलावा सोडतो, जो नंतर नैसर्गिक नायट्रोजन (Natural Nitrogen) म्हणून काम करून माती समृद्ध करतो.


शुद्ध, देशी तांदूळ


तांदूळ स्थानिक, हंगामी आहे आणि आपल्या खाद्य वारशाशी संबंधित आहे. भात खाल्लाने आरोग्य चांगले राहते. म्हणून असे मानले जाते की तांदूळ शुद्ध सोन्यापेक्षा कमी नाही.