Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) सामूहिक हत्या (Mass Murder) करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या बाळासह चार जणांना ठार करण्यात आलं आहे. कुटुंब झोपेत असतानाच त्यांच्यावर हल्ला करत जीवे मारण्यात आलं. हत्येनंतर आरोपी सर्व मृतदेह फरफटत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. घटनेची माहिती मिळताच एसपी ग्रामीण धर्मेंद्र सिंह यादव घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या चेराई गावात ही घटना घडली आहे. येथे रात्री एक कुटुंब घरात झोपलेलं होतं. यावेळी आरोपी घऱात घुसले आणि चारही जणांची हत्या केली. मृतांमध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेह खेचत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. सकाळी नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे.  


गावकऱ्यांना सकाळी पीडित कुटुंबाच्या घरातून धूर येताना दिसला. ग्रामस्थांनी जाऊन पाहिलं असता सगळेच हादरले. अंगणात चार जळलेले मृतदेह पडलेले होते. यामध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही मृतदेह होता, जो जवळपास पूर्ण जळाला होता. तर इतर मृतदेह अर्धवट जळाले होते. 


पोलीस दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं. फॉरेन्सिक एक्स्पर्ट घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत. मृत कुटुंब शेतीचं काम करत होतं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 


दरम्यान ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आरोपी कुठून आले होते, किती होती आणि कोणत्या शस्त्राने हत्या केली याची माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तसंच ग्रामस्थांची चौकशी केली जात आहे.