Crime News: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तोर येथे एका व्यक्तीची जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमध्ये त्याला जिवंत जाळून ठार करण्यात आलं. पीडित व्यक्तीच्या भावाचं आरोपींच्या कुटुंबातील विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याने हे कृत्य करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, इतर फरार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराजू असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. त्याचा लहान भाऊ पुरुषोत्तम याचे एका विवाहित महिलेसह संबंध होते. दोघेही कोनसीमा जिल्ह्यातील रामचंद्रपुरम मंडल येथील निवासी होते. महिलेच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी नागराजूला फोन केला होता. 


महिलेच्या कुटुंबातील सदस्य आणि नागराजू गाडीतून एका ठिकाणी जात होते. यावेळी नागराजूला मारहाण करत त्याच्या गाडीत रशीने बांधण्यात आलं. यानंतर त्यांनी गाडीवर पेट्रोल ओतलं आणि गाडी जाळून टाकत नागराजूला ठार केलं. 


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना कार दरीत ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. पण दगडामुळे काग अडकली आणि त्यांचा हा प्रयत्न फसला. तेथून जाणाऱ्या काही लोकांनी नागराजू जळत्या कारमध्ये अडकले असल्याचं पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आगीत जळून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 


नागराजूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, इतर आरोपींची माहिती मिळवली जात आहे.