मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह सुरतमध्ये थांबलेल्या आमदारांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. या सर्व आमदारांना आसाम या राज्यात नेण्यात येणार आहे. शिवसेना बंडखोरांना रात्रीतून आसामला हलवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांना आसामची राजधानी गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही बंडखोर आमदार पुन्हा जावू शकतात अशी भीती एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळेच सर्वच आमदारांना सुरक्षित स्थळी नेणार आहेत.


सुरत एअरपोर्टवरुन त्यांना गुवाहटी या ठिकाणी नेणार आहेत. स्पाईस जेटचं विमान यासाठी तयार ठेवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


शिवसेना नेते सुरतला शिवसेना आमदारांना भेटीसाठी आले होते. त्यामुळे आमदारांना आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत आहे.