नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर त्यावर पाकिस्तानकडून हरकती सुरु झाल्या आहेत. भारताच्या हवाईदलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानाच घुसून दहशतवाद्यांची ठिकाणं उध्वस्त केली होती. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांसह जवळपास ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.


क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर भारतीय जवान अभिनंदन वर्धमानला परत आणण्याची मागणी होत आहे.


1.30 : पाकिस्तानने आता दावा केला आहे की बडगाममध्ये पडलेल्या चॉपरशी आमचा काहीही संबंध नाही.


1.20 : पठानकोट ते जम्मू नॅशनल हायवेचा चार्ज भारतीय जवानांनी घेतला. याआधी पंजाब पोलिसांकडे होता चार्ज.


1.00 : अमृतसर एयरपोर्टवरुन सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थानी पोहोचवण्यात आलं आहे.


12.50 : पाकिस्तानातील सर्व एअरपोर्ट बंद करण्यात आले आहेत. पाकिस्ताननेही सर्व विमानं रद्द केली आहेत.


12: 40 : भारतीय वायुदलाने सर्व लढाऊ विमानांना अलर्ट जारी केला आहे. २ मिनिटात उड्डान भरता येईल अशा प्रकारचा अलर्ट पयलटला जारी करण्यात आला आहे. असा प्रकारचे अलर्ट आतापर्यंत फक्त युद्धाच्या वेळी दिले जात होते.


12.30 : बॉर्डर जवळच्या सर्व रुग्णालयांमधील औषधांचा स्टॉक वाढवला. सर्व रुग्णालयांना अलर्टवर राहण्याचे आदेश


12.10 : जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, पठानकोट, चंडीगड, देहरादून आणि धर्मशाला एअरपोर्टवरुन सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. सगळ्या एअरपोर्टवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.


12.00 : भारताने पाकिस्तानचं F16 हे विमान पाडलं आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करुन परत जात असताना भारताने हे विमान पाडलं. 


11:52 : पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्त्यांनी ट्विट करत दावा केला आहे की, पाकिस्तानी वायुदलाने भारताच्या दोन विमानांना लक्ष्य केलं आहे. ज्यामध्ये एक विमान पाडलं असून भारताच्या एका पायलटला अटक केली आहे.


11: 45 गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व अर्धसैनिक दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफचे मुख्य अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.


11. 30 : भारत-पाकिस्तानातील वाढता तणाव पाहता जम्मू-काश्मीर, लेह, पठानकोट एअरपोर्टवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून जाणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत.


11.20 : पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या या विमानांनी घुसखोरी केली आहे. पण भारताने लगेच अॅक्शन घेतल्यानंतर ही विमानं माघारी परतली आहेत.


11.00 : गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सकाळी नॉर्थ ब्लॉकमध्ये एनएसए अजित डोवाल, गृह सचिव राजीव गाबा, रॉ चीफ, आयबी चीफ यांच्यासोबत बैठक घेतली.


लाईव्ह टीव्ही