चंदीगड : गुरमीत बाबा राम रहिमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. हरियाणा आणि पंजाबमधील हिंसाचारात ३८ जणांचा बळी गेलाय. हिंसाचार करणारा जमाव खरंच बाबा समर्थक होते की गुंड असा सवाल उपस्थित करणारी काही दृष्यं समोर आलीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गुंडांनी आपली तोंडं लपवल्याचं सीसीटीव्ही दृष्यांमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे या दृष्यांवरुन हे भाडोत्री गुंड असल्याचे बोललं जातंय. प्रत्येकाला हजार रुपये देऊन तोडफोड करण्यास सांगितल्याचा दावा करण्यात येतोय. तसंच या गुंडांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती असं सांगण्यात येतंय.


या गुंडांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्यासाठी अशाप्रकारे हिंसाचार पेटवला का या अनुषंगाने आता तपास करण्यात येतोय. या गुंडांना यासाठी कुणी पाठवलं याचाही तपास सुरु आहे.