मुंबई : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीननं आक्षेप घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीतारमण यांचा हा दौरा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नसल्याच्या वल्गना चीननं केल्यात. भारत आणि चीनमध्ये सध्या पूर्व सीमेवरुन वाद सुरु आहे. असं असताना भारतीय संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा अनुकूल नाही अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी दिलीय.


सीमा वाद चर्चेने सोडवण्यासाठी भारत चीनच्या प्रयत्नांना मदत करेल असंही त्यांनी सांगितलंय.