नवी दिल्ली : गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगलेच नाखुश असल्याचे दिसत आहे. 


योगी आदित्यनाथ पराभवाने निराश?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळेच की काय त्यांनी गुरूवारी आयोजित सर्व कार्यक्रम आणि दौरे रद्द केले आहेत. पण योगी आदित्यनाथ हे काही अधिका-यांच्या भेटी घेणार आहेत. या बैठकीत जनतेच्या समस्यांबाबत चर्चा होऊ शकते. जनतेमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री अधिका-यांना योग्य दिशा-निर्देश देऊ शकतात. पराभवाने नाराजा झालेले मुख्यमंत्री जनतेच्या समस्या सोडवून त्यांच्या भाजपप्रति विश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. 


जनतेच्या समस्यांकडे लक्ष


उत्तर प्रदेशात सध्या नवे राजकीय समिकरण उदयास आले आहे. येथे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली आहे. या आघाडीचा परिणाम असा की, फुलपूर आणि गोरखपूर या दोन्ही मतदार संघात सपाची सायकल बसपच्या हत्तीच्या सहकार्याने जोरदार पळाली. इथे समाजवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडणून आले. भाजपला इथे आपेक्षा होती. पण, अपेक्षेप्रमाणे काहीच घडले नसल्याने भाजपला सत्ता असूनही येथे जोरदार आपटी खावी लागली. तर, त्या तूलनेत काँग्रेसची आवस्था तर, फारच दारूण झाली. काँग्रेस उमेदवाराला येथे आपली अनामत रक्कम वाचवता आले नाही.


मतदारसंघ निहाय मतांची आकडेवारी


फुलपूर मतदारसंघ


काँग्रेस  - मनीष मिश्र (१९,३५३ मते)
समाजवादी पक्ष  - नागेंद्र पटेल ( ३, ४२, ७९६ मते)
भाजप कौशलेंद्र पटेल २,८३,१८३ मते)


गोरखपूर मतदारसंघ


काँग्रेस - डॉक्टर सुरहिता करीम (१८,८५४ मते)
समाजवादी पक्ष  - प्रविण निषद ( ४, ५६, ५१३ मते)
भाजप - उपेंद्र शुक्ल (२१ ८८१)