नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कोविड १९ रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण ही वाढत आहे. आता मृत्यूची संख्या 1.32 लाखांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा मृत्यू दर 1.47 टक्क्यांच्या जवळपास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 15 दिवसांत दिल्लीत सुमारे 1400 लोकं मरण पावले आहेत. दिल्लीच्या रूग्णालयात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग आहे.


दिल्लीत नवीन प्रकरणे आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. पण कोविड -१९च च्या वाढत्या घटनांकडे पाहता असे दिसते की बर्‍याच राज्यांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.


राजधानी दिल्लीमध्ये कोरोना शिवाय इतर आजारांमुळे देखील मृत्यू होत आहे. हार्टअटॅक, उच्च रक्तदाब, टीबी आणि कँसर सारख्या रोगांमुळे जीव गमवणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोना पेक्षा ५ पटीने अधिक आहे. दिल्लीत स्मशानघाटावर 100 हून अधिक मृतदेह येत आहेत. २० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे तर ८० जणांचा इतर रोगांमुळे मृत्यू होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे.


स्मशान घाटावर काम करणारे लोकं म्हणतात की, गेल्या १५-२० वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात मृतदेह कधीच आले नव्हते. दुसरीकडे प्रदुषणाची भर पडल्याने लोकांना याचा त्रास होत आहे.