श्रीनगर : सीमेवर पाकिस्तानकडून खोड्या काढणं सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी आणि पूँछ इथं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झाले, तर 6 जवान जखमी झालेत. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात ग्रेफचा एक नागरी कामगार ठार झाला तर बीएसएफच्या एका जवानासह दोघं जण जखमी झालेत. 


राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये साडेसात वाजता आणि पूँछ जिल्ह्यात कृष्णागती सेक्टरमध्ये 7 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानच्या बाजूनं हल्ले सुरू झाले. या दोन्ही ठिकाणी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.