हापूड़ : आपलं यादगार करण्यासाठी लोकं अनेक आयडियाच्या कल्पना लढवतात. आता जयपूरच्या शाहरूख खान यालाच बघा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख लग्न करण्यासाठी हापूडहून हेलिकॉप्टरने आला आणि नवरीलाही हेलिकॉप्टरनेच घेऊन गेला. हेलिकॉप्टरमध्ये आलेली ही वरात सध्याच्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवरदेवाच्या हेलिकॉप्टरच्या आगमनावेळी स्थानिक प्रशासनाने कडक बंदोबस्तही ठेवला होता. 


जयपूरच्या शाहरूख खानचं लग्न हापूडच्या खाई परीसरात राहणा-या तंजीम या मुलीशी ठरलं होतं. बुधवारी त्यांच लग्न झालं. ठरलेल्या वेळेवर सगळेजण नवरदेवाची रस्त्यावर वाट पाहत होते. अशातच अचानक जोरादार आवाजासोबत आकाशात उडत असलेल्या हेलिकॉप्टरकडे सर्वांच्या नजरा गेल्या. काही वेळातच हेलिकॉप्टर आकाशातून खाली उतरलं. त्यातून नवरदेव बाहेर आला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 



शाहरूख खानने सांगितले की, माझं स्वप्न होतं की लग्न यादगार करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं. तेव्हा तंजीम म्हणाली की, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, तिच्या स्वप्नातील राजकुमाराने तिला विमानातून उडवून घेऊन जावं. आणि तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. तिकडे हेलिकॉप्टरने आलेल्या वरातीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती.