नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी या गुजरात आणि हिमाचलमधील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘जो जिंकतो, तोच राजा असतो’. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हा विकासाचा विजय आहे’, असे त्या म्हणाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसच्या चांगल्या प्रदर्शनाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ‘विजयाचं अंतर महत्वाचं नसतं. जो जिता वही सिकंदर. हे सर्वच कार्यकर्त्यांच्या कठिण परिश्रम आणि विकासावर विश्वास ठेवणा-यांचा विजय आहे’.



गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात भाजपच्या यशावर गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्हाला दोन्ही राज्यात बहुमत मिळणार आणि आम्ही इथे सरकार स्थापन करणार’