मुंबई : आपल्याकडे जेवण हे वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात बनवले आणि शिजवले जाते. एवढेच काय तर, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात देखील ठेवलं जातं. असे म्हणतात की, वेगवेगळ्या पद्धतीनं आणि भांड्यात जेवण बदलल्याने जेवणाला एक विशिष्ट प्रकारची चव येते. त्यामुळे बऱ्याचदा लोकं ठरवुन त्या, त्या भांड्यात जेवण बनवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय असे देखील म्हटले जाते की, धांतुमुळे आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. पितळेच्या भांड्यात अन्न शिजवून किंवा धातूच्या भांड्यात खाल्ल्याने त्यातील पोषक घटक अन्नात मिसळतात आणि त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.


प्रत्येकाच्या घरांमध्ये साधारणपणे आपल्याला भांडी दिसतात ती स्टीलची. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला कोणताही फायदा होत नाही. या उलट शरीराचे नुकसानच होते.


स्टीलची भांडी कार्बन, क्रोमियम आणि निकेल या तीन धातूंनी बनलेली असतात. त्यामुळे त्यात फास्ट किंवा जास्त टेम्परेचरवर अन्न शिजवल्याने या भांड्यांमध्ये असलेल्या रसायनांवर प्रतिक्रिया होते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.


त्यामुळे तुम्ही स्टीलची भांड सहसा वापरु नका, या उलट जर तुम्ही पितळेची भांडी वापरलात तर त्याचा अनेक प्रकारे तुमच्या शरीराला फायदा होईल.


पितळेच्या भांड्यांमध्ये तयार केलेले अन्न पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यात बनवलेल्या अन्नामध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्त शुद्ध होते. 


तसेच पितळेच्या ग्लासात रात्रभर पाणी भरून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने देखील शरीराला फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे रोगांशी लढण्यास मदत करते.


फक्त पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, जसं की, या भांड्यांमध्ये आंबट घटक किंवा आम्ल असलेले लिंबू, टोमॅटो किंवा अशा गोष्टींसारखे आम्लयुक्त पदार्थ कधीही बनवू नये. पितळेची भांडी ऑक्सिजनवर प्रक्रिया करून कालांतराने काळी पडतात. त्यामुळे ऑक्सिडायझेशन केलेल्या पितळेच्या भांड्यांमध्ये कधीही अन्न शिजवू नका.