नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे जाऊन केलेल्या हवाई हल्ल्यात एकूण ४० ते ५० दहशतवद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका इटालियन महिला पत्रकाराले 'विऑन' या इंग्रजी वृत्तवाहिनीला याविषयीची माहिती दिली. अधिकृतांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING