नवी दिल्ली : आता भारताशी संबंध सुधारण्याची कोणतीच आशा नसल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत वारंवार युद्धनितीचे उल्लंघन करतोय यामुळे दोन्ही देशांमधील संबध सुधरणार नाहीत असेही ते म्हणाले. 


२ जण जखमी 


भारताकडून झालेल्या गोळीबारात काश्मीरमधील २ जण जखमी झाल्यानंतर आसिफ यांचे वक्तव्य पाकिस्तानी वर्तमानपत्र 'डॉन'मध्ये छापून आलयं.


'भारत करतोय उल्लंघन'


भारत वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन करतोय त्यामुळे भरताशी संबध सुधारणार नसल्याचे वृत्त पाकिस्तान सरकारचे रेडियो चॅनलमधून देण्यात आलयं.