नवी दिल्ली : भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करी दलाला यश आले आहे. जम्मू-काश्मिरमधील बारमुल्ला जिल्ह्यात त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती लष्करी दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलीय.


ऊरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न हे दहशतवादी करत होते.  तर काल दुसऱ्या एका घटनेत राजौरी भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून एक जखमी झाला आहे.