मुंबई : जन धन खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देखील हे खाते उघडले असेल, तर आता तुम्हाला दरमहा 3 हजार रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहेत. कोणत्याही योजनेंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करत आहे, त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जन धन खात्यात हस्तांतरित केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात. जन धन खातेदारालाही या योजनेचा लाभ मिळतो.


केंद्र सरकारच्या मानधन योजनेत 18 वर्षे ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे हस्तांतरित केले जातात. यामध्ये वर्षाला 36 हजार रुपये ट्रान्सफर होतात.


लाभ कोणाला मिळतो?
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. पथ विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


याशिवाय तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.


कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे बचत खाते तपशील देखील सबमिट करावे लागतील.


किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला विविध वयोगटानुसार 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. तर 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील.


या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFS कोड देणे आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.