नवी दिल्ली : राळेगणसिद्धीप्रमाणे आदर्श गावं निर्माण करण्यात पुढाकार घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. भाजपचे खासदार आणि आमदार यांच्या पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. नमो अॅपद्वारे मोदींनी भाजपच्या या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी गावांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मोदींनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना केल्या. यावेळी बोलताना मोदींनी राळेगणसिद्धीमधील स्वच्छ गाव मोहीमेचा उल्लेख केला. तसंच सरकारच्या योजना जनतेपर्यंत विशेषतः शेतक-यांपर्यंत पोहचवा असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं.