नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव न घेता, माजी पंतप्रधानांना 'भारत माता की जय' बोलण्यास लाज वाटत असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. या बैठकीसाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत पंतप्रधान मोदींनी शांतता, ऐक्य आणि सुसंवाद यावर अधिक भर दिला जावा असं म्हटलंय. शांततेशिवाय देशाचा विकास शक्य नसल्याचंही ते म्हणाले. 


काही लोक केवळ आपल्या पक्षासाठी जगत आहेत. एकीकडे केवळ पक्षहित असल्याची टीका त्यांनी केली. आमच्यासाठी देशहित महत्त्वाचं असून, आम्ही देशासाठी  जगत असल्याचं ते म्हणाले. आम्ही सबका साथ सबका विकास मार्गांवर चालणारे लोक असल्याचं त्यांनी सांगितलं.