गिद्धौर (जमुई) : असे म्हणतात की, प्रेम हे अंधळ असतं आणि त्यात बुडलेल्या व्यक्तीला ना नात्याची काळजी असते ना समाजाची. बिहारमधील जमुई येथील मननपूर गावातील असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे नात्याचा विचार न करता मामाच्या गावाला रहायला आलेल्या भाच्याचं आपल्या मामीशी प्रेम झालं आणि नंतर दोघांनीही संधी पाहून त्या घरातून पळ काढला. त्य़ानंतर या दोघांनी लग्न करुन आपलं सुखी जीवन घालवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु दोघांच्या निर्णायामुळे घरच्या सगळ्या लोकांना धक्का बसला आहे. तर मामाची अशी हालत झाली की, तो कोणाला ही आपलं तोंड दाखवू शकतं नाही.


ही घटना मननपूर गावातील आहे. जिथे लग्नाच्या काही दिवसांनी एका नवविवाहित महिलेचा तिच्या भाच्यावर जीव जडला. हे मामी-भाचे एकमेकांना भेटायचे परंतु घरच्यांनी त्यांच्या या नात्यावर कधी संशंय घेतला नाही. घरातील लोकांना वाटलं की, सर्व काही ठीक आहे आणि एका मामीचे आपल्या भाच्या प्रतिचे मातृत्वाचे प्रेम आहे.


परंतु एके दिवशी जेव्हा मामी आणि भाचा घरातुन पळून गेले, तेव्हा मात्र या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मामाला तर काय करावे आणि समाजात काय तोंड घेऊन फिरावे हेच सुचत नव्हते आणि मामा सुन्न झाला.


माहितीनुसार मननपूर गावात राहणाऱ्या युवकाचे डुमरो गावात राहणाऱ्या मुलीशी लग्न झाले होते. रतनपूर साह टोला येथील रहिवासी चंदन साह आपल्या मामाकडे मननपुरात येत असायचा. या काळात त्याची त्याच्या मामीशी जवळीक वाढत गेली, त्यानंतर या दोघांनीही त्यांचे एकमेकांप्रतिची भावना व्यक्त केली.


नंतर या दोघांनीही एकमेकांसोबत उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि संधी मिळताच कोणालाही न सांगता त्यांनी तेथून पळ काढला आणि लग्न केलं.