पटणा : बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


पंतप्रधानांच्या या ट्विटला नितीश कुमार यांनीही रिप्लाय दिला आहे. मी घेतलेल्या निर्णयामुळे पंतप्रधानांनी माझं अभिनंदन केलं, याबद्दल त्यांचे धन्यवाद, असं ट्विट नितीश कुमार यांनी केलं आहे.



दरम्यान आरजेडी आणि काँग्रेससोबत असलेलं महागठबंधन तोडल्यानंतर नितीश कुमार भाजपच्या साथीनं पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. नितीश कुमार यांच्या या सरकारमध्ये भाजपही सहभागी होणार आहे. बिहारचे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली आहे. नितीश कुमार हे उद्याच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत मॅजिक फिगर म्हणून १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.  सध्या लालूंच्या राजदचे ८०, काँग्रेस २७, जेडीयूचे ७१ आणि भाजपचे ५३ आमदार आहेत. तसेच इतर चार आमदार आहे. भाजपसोबत गेल्यास जेडीयू ७१, भाजप ५३ आणि ४ अपक्ष असे मिळून १२८ आमदार होत आहेत. यामुळे बिहारमध्ये मॅजिक फिगरचा आकडा नितीश अगदी सहज पार करत आहेत.