श्रीनगर : आज दुपारनंतर पाकिस्तानने (Pakistan) काश्मीरच्या (Kashmir) उरीसहीत तीन सेक्टरमध्ये सीमारेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत गोळीबारी करण्यात आली. याला भारतीय सैन्याकडून (indian Soldier) जशास तसे उत्तर देण्यात आले. यामध्ये भारतीय सैन्यातील दोन जवान शहीद झाले तर चार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे चार सैनिक मारले. तसेच पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉंच पॅड उध्वस्त करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील तीन सेक्टरमध्ये शुक्रवारी गोळीबारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.  पाकिस्तानी सैन्याने बारामुलाच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.



बांदीपोरा (Bandipora) जिल्ह्यातील गुरेज सेक्टरच्या इजमर्गमध्ये सीमारेषेवर उल्लंघन करण्यात आले. याच्या काही मिनिटानंतर कुपवाडा जिल्ह्याच्या केरन सेक्टरमध्ये गोळीबार केला.