जम्मू-काश्मीर : पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर मोठ्याप्रमाणात गोळीबार करत रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.  पाकिस्तानी सैन्यानं पुंछ विभागातील बालाकोट परिसरात तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.


भारतीय नागरिकांचा मृत्यू


यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. या गोळीबारात मृत्यूममुखी पडलेल्या नागरिकांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.