मुंबई : भारतीय लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तान नवनव्या कुरापती करतंय. त्याचाच नवा प्रकार म्हणजे पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. लष्करी, आर्थिक आणि राजकीय... असा सगळ्याच पातळ्यांवर बिथरलेला पाकिस्ताना आता वाट्टेल त्या कुरापती काढू लागला आहे. पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. त्यांच्याच बटालियनचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत आहेत. भारतीय जवानांकडून माहिती काढून घेण्याचा नवा फंडा पाकिस्ताननं शोधून काढला आहे. भारतातल्या आर्मी कंट्रोल रुममध्ये असे फोन येऊ लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैनिकांचे काय प्लॅन ठरलेत हे विचारलं जातं. त्यामुळे भारतभरातल्या लष्करी तळांना यासंदर्भातला अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय लष्करातल्या जवानांना, अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्टही पाठवत आहेत. त्यातूनही काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. इतक्या वेळेला भारतीय लष्करासमोर तोंड आपटल्यावरही पाकिस्तानला अक्कल येत नाहीये.


भारतीय जवान आणि भारतीय लष्कराला अजूनही त्यांनी ओळखलेलंच नाही. किती पण फोन करा.... नखाएवढी तरी माहिती मिळणार नाही.