नवी दिल्ली : दहशतवादाच्या आडून भारताविरोधात अघोषित युद्ध पुकारणाऱ्यांना भारतीय जवान जशास तसं उत्तर देतील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय. ४८व्या मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी सर्जिकल स्ट्राईकबाबत भारतीय जवानांचं मोदींनी कौतुक केलं. 


वायुसेनेचं कौतुक 


यावेळी मोदींनी वायुसेनेचा विशेष उल्लेख केला. कोणत्याही परिस्थितीत जीवाची बाजी लावून देशवासियांसाठी धावून जाणाऱ्या वायुसेनेच्या जवांनाचं मोदींनी कौतुक केलं. तसंच लष्करातील स्त्रीशक्तीबाबतही मोदींनी गौरवोद्गार काढलेत.