नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर आता पाकव्याप्त काश्मिरात पुन्हा आवाज उठू लागलाय. पाकव्याप्त काश्मिरमधील नेत्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.


पाकिस्तानला खडा सवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकव्याप्त काश्मीरमधील तौकीर गिलानी या बंडखोर नेत्याने पाकिस्तानला खडा सवाल केलाय. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. या नेत्याने पाकिस्तानचा दावा खोडून काढलाय. 


पाकिस्तानचा बुरखा फाडला


काश्मीर तुमचा आहे असे कोठे लिहले आहे. हा पाकिस्तानातील मुस्लिम काँन्फरन्सचा खोटा प्रचार आहे. ज्याला कसलाही आधार नाही. आमच्या शौचालयांवरही हेच लोक काश्मीर पाकिस्तानचा होणार असे लिहितात, असे सांगत तौकीर गिलानीने पाकिस्तानचा बुरखा फाडून काढला.


मीरवाईज उमर फारुख आणि सज्जाद लोनच्या वडिलांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात आहे. या व्यतिरिक्त लिबरेशन फ्रंटच्या मारल्या गेलेल्या ६५० लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जिहादींना पाकिस्ताननेच समर्थन दिले आहे, थेट आरोप तौकीर गिलानी या नेत्याने केलाय.



 मूर्खपणाचा कळस 


पाक तथाकथित स्वातंत्र सैनिकांच्या अंत्यसंस्कारासाठी ३० हजार रुपयांची मदतही करतो, हा दिखावूपणा असून तो एक निव्वळ मूर्खपणाचा कळस आहे. हेच पाकिस्तानी लोक टीव्हीवर काश्मिरींना नमक हराम असल्याचे हिणवतात, अशा शब्दात तौकीर गिलानीने पाकिस्तानवर हल्लाबोल केला.