वाराणसी : वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनावरुन आता राजकारण रंगू लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात येतोय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केलाय. ट्विट करुन राहुल यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय. 'हेच का भाजपचं बेटी बचाओ, बेटी पढाओ' अस सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 


तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या घटनेचा निषेध केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या घटनाक्रमाचा सगळा अहवाल मागवलाय.