मुंबई : कोविंद राष्ट्रपती झाले काय किंवा गोपाळ झाले काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण, ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात, राज्यात एवढे विषय सुरू असतात. त्यावर कधी कुठल्या राष्ट्रपतींनी मत मांडलंय किंवा भूमिका घेतलीय? 


जनता राष्ट्रपतींना आपल्या समस्या कळवत असते, त्यांना काय उत्तरं मिळतात? देशातील जनतेला राष्ट्रपती या व्यक्तीचा काही उपयोग नाही, मग त्या पदावर कोणीही बसलं तरी काय फरक पडतो?, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.