सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेवर येऊनही भाव दिला नाही. शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंढरपुरात केला. ते ऊस परिषदेत बोलत होते. जोपर्यंत दिलेला शब्द मोदी पाळत नाही तोपर्यंत त्यांना उपद्रव देत राहणार अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.