नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील या भेटीवेळी उपस्थित होते. 


मार्च एन्डला दिल्लीत शेतकरी परिषद


मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये शेतकरी परिषद होणार आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात येतंय. हमीभावासंदर्भात शेट्टी लोकसभेत अशासकीय विधेयक आणणार आहेत. त्याला काँग्रेसनं पाठिंबा द्यावा अशी विनंतीही राजू शेट्टींनी यावेळी केली आहे.