नवी दिल्ली : आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे. बिहार निवडणुकीआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय लष्करामध्ये आरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत आठवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जाती आणि जमातींना लष्करामध्ये आरक्षण हवं अशी मागणी मी पंतप्रधानांकडे करत असल्याचं आठवले म्हणालेत. लवकरच आपण पंतप्रधानांशी याविषयी बोलू अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे. तसंच देशाच्या सेवेसाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात लष्कारत जावं असं रामदास आठवले म्हणाले. याआधी क्रिकेटमध्येही आरक्षण असावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली होती.