नवी दिल्ली : INS विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना, सैनिकांचं बलिदान याच्याशी खेळ करुन  सैनिकांच्या बलिदानाचं बाजारात लिलाव करुन मातृभूमीचा लिलाव करुन भाजपचे महात्मा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्याचे महापूत्र निल सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि इतकं होऊनही मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, राष्ट्रभक्तीची भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात, काल त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली घेण्याचा प्रयत्न केला. तो बघून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ हेगडेवार आणि आजचे आमचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  


तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा एक माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी झाली. आपलं स्वप्न आपण पूर्ण करु शकलो, त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैशे गोळा केले, लोकांना फसवूण, किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने, त्याचे पुरावे समोर आले आणि आता बोलताता पुरावे कुठे आहेत, संजय राऊत काहीही बोलतात. अरे तुम्ही काय बोलताय असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीस यांना विचारला आहे. 


काल फडणवीस म्हणाले आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे, तुम्ही काय कापलं ते सांगा. या देशासाठी तुमचं काय बलिदान आहे. उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन तुम्ही पैशे गोळा करता,  कधी राममंदिराच्या नावाने पैस गोळा करता. कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले,


आमच्या महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान त्याचा लिलाव करुन पैसे गोळा केले, अशा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही वकिली करताय, तुम्ही अभ्यास करुन बोलता असं म्हणता, मग आम्ही सांगतो तो पुरावा नाही का असा सवालही संजय राऊत  यांनी विचारला आहे.