रांची : झारखंडमधील धनबादमध्ये कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने प्रथम आईचा जीव घेतला, त्यानंतर चार मुलांना मारले. आता त्याच कुटुंबातील आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर येथील परिसरात भयाण शांतता पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पीडित कुटुंबातील सहाव्या सदस्याचाही रांचीच्या रिम्समध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसातच कोरोनाने या कुटुंबात खळबळ उडाली. आधी आईचा संसर्गाने मृत्यू झाला. कोरोनाने संपूर्ण जग हादरले आहे. देशातील अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. धनबाद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील आई आणि पाच मुलांचा एकामागोमाग एक मृत्यू झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर चारही मुलांना संसर्ग झाल्याचे समोर आले. तर एका मुलाला फुफ्फुसचा कॅन्सर झालेला होता. उपचारादरम्यान त्या मुलाचे निधन झाले. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील इतक्या जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  


पाचव्या मुलाला पूर्वी धनबाद कोविड हॉस्पिटलमधून रिम्स येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचेही निधन झाले. पीडित कुटुंबातील आणखी दोन सदस्य कोरोनाविरुध्द युद्ध लढा देत आहेत. ८८ वर्षांच्या आईचा कुटुंबात प्रथम मृत्यू बोकारो येथील नर्सिंग होममध्ये झाला. लग्नसमारंभात हजेरी लावून ती नातेवाईकांसह दिल्लीहून परतली. अंत्यसंस्कारानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनंतर, रिम्सच्या कोविड वॉर्डमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला.


काही दिवसांनंतर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असताना दुसर्‍या मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूचे तांडव येथे थांबले नाही. तिसर्‍या मुलाला धनबादमधील खासगी क्वारंटाईन केंद्रात दाखल केले. त्याच वेळी अचानक प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यूही झाला. ज्यावेळी कार चालकाने त्यांना कोविड केंद्रात  आणले तेव्हा डॉक्टरांमधे त्याला मृत घोषित केले. गुरुवारी चौथ्या मुलावरही काही आजारावर उपचार सुरूुअसताना टीएमएच जमशेदपूर येथे निधन झाले. २० जुलै रोजी, पाचवा मुलाने (कुटुंबातील सहावा सदस्य) रिम्सच्या कोविड वॉर्डमध्ये अखेरचा श्वास घेतला


धनबाद सिव्हिल सर्जन डॉ. गोपाल दास यांनी सांगितले की, आतापर्यंत या पीडित कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला आहे आणि दोन सदस्य कोविड रुग्णालयात दाखल आहेत. तथापि, दोघांचीही स्थिती गंभीर आहेत. तसेच मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना इतर आजारांनी ग्रासले होते आणि सर्व सदस्य वयाच्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या घटनेनंतर तेथील प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला आहे. येथील लोक घाबरले आहेत.