नवी दिल्ली : लालू यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. पण लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. तेजप्रताप यांनी पत्नी ऐश्वर्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. तेजप्रताप यांचं म्हणणं आहे की, ते आणि ऐश्वर्या यांचे विचार खूप वेगळे आहेत. त्यामुळे एकत्र राहणं फार अवघड आहे. यावेळी तेजप्रतापचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या विरोधात झालं आहे. त्यामुळे तेजप्रताप एकटे पडले आहेत.
 
हनीमूनवरुन तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा वाद झाल्याची चर्चा आहे. लोकल मीडियाच्या रिपोर्टसनुसार तेजप्रताप यादव यांनी म्हटलं की, त्यांची आणि पत्नीमध्ये हनीमूनवरुनच वाद सुरु झाला होता. ऐश्वर्याला हनीमूनसाठी इंडोनेशियाला जायचं होतं. पण त्यासाठी नकार दिल्याने हा वाद सुरु झाला. ते एक धार्मिक व्यक्ती असल्याने अशा जागेवर जाणं शोभत नाही. ऐवढंच नाही तर तेजप्रतापने ऐश्वर्यावर आरोप केले आहेत की, आधुनिक विचारांच्या ऐश्वर्याला सिगरेट आणि ड्रिंक करण्याचा देखील शौक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजप्रताप यांनी म्हटलं की, ते आता संसाराची गाडी पुढे नाही नेऊ शकत. हा विवाह राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप देखील तेजप्रताप यांनी केला आहे. आपला या लग्नाला विरोध होता पण घरच्या व्यक्तींनी त्य़ांचं ऐकलं नाही आणि जबरदस्ती त्यांचा विवाह करुन दिला.


सारण लोकसभा सीटसाठी दबाव


मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्या तिचे पिता चंद्रिका प्रसाद राय यांना सारण लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं यासाठी तेज प्रतापवर दबाव टाकत असल्याची देखील चर्चा आहे.