नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपाला घरचा आहेर दिला आहे. जबलपुर येथे पोहोचल्यावर त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पार्टी आता अटल आणि आडवाणींची राहीली नाही. लालकृष्ण आडवाणी हे पार्टीमध्ये विशेष तर काय साधारणपण राहिले नाहीत, असे त्यांनी म्हटले.


वेळ दिली नाही 


१३ महिन्यांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली होती.


पण आतापर्यंत पंतप्रधानांनी त्यांना वेळ दिली नाही. 


जे काही होईल ते सर्वांसमोर  


 यापुढे कोणत्याही मुद्द्यावर सरकारशी पडद्याआड चर्चा करणार नाही असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.


आता जे काही होईल ते सर्वांसमोर होईल असेही ते म्हणाले.