मुंबई : कोरोनाची दुसरी लाट  (Corona Second Wave) पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्‍या लाटेचा धोका वाढू लागला. येत्या काही दिवसांबाबत आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेकडे (Corona Third Wave) वाटचाल करत आहे. पुढील 100 ते 125 दिवस फार महत्वाचे आहेत, या वेळी लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांत तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आतापासून खबरदारी घेतली पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


पंतप्रधान मोदी यांनीही व्यक्त केली चिंता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर, यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्र, केरळसह 6 राज्यात कोरोनाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 आढावा बैठकीत पंतप्रधान म्हणाले, 'आम्ही सर्वजण अशा ठिकाणी आलो आहोत की जिथे तिसर्‍या लाटेची भीती सतत व्यक्त केली जात आहे. घटत्या कलमुळे तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिल्यावरही काही राज्यांमधील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. बैठकीत उपस्थित राज्यांमधून गेल्या आठवड्यात 80टक्के दुर्दैवी मृत्यू तसेच 84 टक्के दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.


जागतिक आकडेवारी काळजी


पंतप्रधानांनी युरोप, अमेरिका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आणि इतर अनेक देशांमधील प्रकरणांच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि 'यामुळे आम्हाला आणि जगाला सतर्क केले पाहिजे' असे ते म्हणाले. कोरोना संपला नाही, असा पंतप्रधानांनी बैठकीत पुनरुच्चार केला आणि लॉकडाऊननंतर कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि होणारी मोठी गर्दी याबाबत चिंता व्यक्त केली. बैठकीत बरीच राज्यांची दाट लोकसंख्या असलेल्या महानगरांमध्ये शहरी लोकसंख्या असलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्याची आणि गर्दी टाळण्याची गरज यावर त्यांनी भर दिला.