श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकिस्तानी सैन्यानं जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान शहीद झालेत. तर तीन भारतीय नागरीक जखमी झालेत. शनिवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्यूत्तरदिलं. मात्र या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान उत्तर प्रदेशचे होते. शहीद एएसआय सत्य नारायण यादव देवरियाचे आणि शहिद विजयकुमार पांडे फतेहपूरचे होते. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानं सांबा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता.