नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांच्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांबाबतच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रोहिंग्यांना भारतात निवारा उपलब्ध करुन द्यावा अशी भूमिका, वरुण गांधी यांनी एका हिंदी दैनिकात मांडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्वासित रोहिंग्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काटेकोर तपासणी करुन, नंतर त्यांना भारतात निवारा उपलब्ध करुन देण्याची भूमिका वरुण गांधी यांनी मांडली आहे. त्यावर राष्ट्रहिताचा विचार करणारे अशा प्रकारची विधानं करणार नाहीत अशी प्रतिक्रिया, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिलीय.